- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
पंढरपुरातील मंदिरात अडकलेल्या तीन महाराजांची अखेर सुटका, आपत्ती व्यवस्थापन पथकानं सुखरूप काढलं बाहेर
|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भीमा नदीची पातळी कमालीची वाढली आहे. त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात (Mahadev Mandir) तीन महाराज अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकाने या महाराजांना बोटीतून सुखरूप बाहेर काढले आहे. सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत. आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि यांना बाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य त्यानंतर…
|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील मौजे शिरढोण येथील ग्रामसेविका जाडकर मॅडम यांनी पदाचा दुरुपयोग करून अर्जदाराचे हक्काचे मालकी हक्क असलेली मालमत्ता नियमबाह्य पद्धतीने अर्जदाराच्या आईच्या नावे लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवित, रहिवासी मारुती दत्तू भुसनर यांनी आज पंचायत समिती पंढरपूर येथे उपोषण सुरु केले आहे. अर्जदार भुसनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गट नंबर ३३ मधील ० हे ३९ आर क्षेत्रापैकी १९.५ आर क्षेत्र त्याच्या नावावर असून त्याच ठिकाणी त्यांचे राहते घर आहे. मात्र, सदर घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी मालमत्ता क्रमांक २४७ अंतर्गत त्यांच्या आई सौ. यशोदा दत्तू भुसनर यांच्या नावे ग्रामसेविकेने चुकीच्या…
ठाणे (उल्हासनगर) : ठाण्यातील उल्हासनगरमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. समर कॅम्पमधील डान्स टीचरनं हे दुष्कृत्य केलं असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत या नराधम डान्स टीचरला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडालीये. १५ मे आणि २१ मे रोजी या टीचरनं चिमुकल्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ज्यावेळी आई वडिलांनी मुलाला त्रास होत असल्यानं डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील कुर्ला कॅम्प परिसरात एका प्ले स्कूलमध्ये उन्हाळी सुट्टीत समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. या समर कॅम्पला उल्हासनगरमधील एका अडीच वर्षीय…
पुणे : मागील चार दिवसांपासून पुण्यातील दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरु आहे. पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेली. अवकाळी पावसामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्पा झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दौंड तालुक्याप्रमाणे पुण्यातील इतर ठिकाणीही पावसाचा कहर पाहायला मिळाला. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. विशेषत: भिगवण येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडवर पाण्याचे तळे साचले आहे. अंदाजे तीन किलोमीटरपर्यंतचा सर्विस रोड पाण्याखाली गेला आहे. मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे.…
बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बारामती, पिंपळी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे आणि नाल्यांचे पाणी कालव्यात मिसळल्याने पाण्याचा दाब वाढला यामुळे लिमटेकजवळील नीरा डावा कालव्यात भगदाड पडले आहे. पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्यातील वहनक्षमता अचानक वाढल्याने ही घटना घडली. मान्सूनपूर्व पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास अडचणी निर्माण झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतजमिनींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…
मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांवर पावसाचं सावट पाहायला मिळालं. तर, काही भागांमध्ये मंगळवारी सायंकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी पावसानं मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपलं. दरम्यान पावसाचं हे सावट अद्याप निवळलं नसून, हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागाला ऑरेंज अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये नारिकांना अतिदक्षतेचा इशारा देत सावधगिरी म्हणून खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मासेमारांना करण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) यांनी 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली यावरुन अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरच्यांकडून आपला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्याला नवरा शशांक हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर आता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे हे फरार झाले आहेत. तर शशांक हगवणे याला…
आई म्हणजे सर्वस्व असते. जगात आल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत आई आपल्यासोबत असते. आईचं महत्त्वं काय हे ज्याच्या डोक्यावर मायेचं छत्र नसतं त्याच्याहून चांगलं कोणी सांगू शकणार नाही मुलांसाठी आई आपलं सर्वस्व पणाला लावते. पण जेव्हा तीच आई या जगातून जाते आणि मुलं तिच्या दागिन्यांसाठी भांडतात तेव्हा तिच्या आत्म्याला होणाऱ्या वेदना किती असह्य असतील याचा कोणी विचारही करु शकत नाही. राजस्थानात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये कलयुगातील मुलाने दागिन्यांसाठी थेट आईचा अंत्यविधीच रोखला. राजस्थानच्या कटपुतली-बेहरोर जिल्ह्यात एका मुलाने आईच्या चांदीच्या बांगड्या मिळाव्यात यासाठी अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल…
सातारा : सातारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाने एक तासभर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. त्याचबरोबर घरे, दुकाने आणि हॉटेलमध्ये पाणी शिरले. दरम्यान, फलटण तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. एके ठिकाणी नाराळाच्या झाडाने पेट घेतला. तर कापडगावला वीज पडल्याने गाय ठार झाली. जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमानातही मोठ्या प्रमाणात उतार आला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यातच जिल्ह्यातील काही भागात पाऊसही झाला. पण, शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात आभाळ भरुन आले. यामुळे काही भागात पाऊस पडला. सातारा शहरासह तालुक्यात तर सकाळी ११ पासूनच पावसाचे थेंब पडू लागले. त्यानंतर साडे आकरा…
पिंपरी चिंचवड : पुण्यात दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या, दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारी वाढल्याचे दिसू लागले आहे. एमआयडीसी भोसरीपोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी ग्रँड हॉटेलसमोर आर्थिक कारणावरून पाच जणांनी मिळून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली बर्गे (रा. चिंबळी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद (सर्व रा. चिंबळी, ता. खेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी…